कापूस पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापन
बऱ्याच ठिकाणी झालेल्या पाऊसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात.कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते. अशावेळी सिंचन दिल्यास अथवा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. सिंचन दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर ३६-४८ तासांत आकस्मिक मर ची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते. डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईत श्री.एम.बी.मांडगेकृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणीवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आकस्मिक मर व्यवस्थापन१. अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा…