तण नियंत्रण – संपुर्ण माहीती पुस्तीका -PDF format Downloadable
book-on-weed-control-and-managementDownload
मोसंबी-
मोसंबी मधील फायटोपथोरा बुरशीमुळे होणारी फळगळ व्यवस्थापनसंपुर्ण माहीतीचा व्हिडीओ https://youtu.be/mRHIeJxvPwk?si=lFsIzyEPcTZZqI56
कापूस पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापन
बऱ्याच ठिकाणी झालेल्या पाऊसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात.कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते. अशावेळी सिंचन दिल्यास अथवा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. सिंचन दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर ३६-४८ तासांत आकस्मिक मर ची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते. डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईत श्री.एम.बी.मांडगेकृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणीवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आकस्मिक मर व्यवस्थापन१. अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा…
अतिवृष्टीच्या दरम्यान खरीप पिकांची घ्यावयाची काळजी…..!
सतत पाऊस झाल्याने बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे. त्यामुळे खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर व हळद या पिकांवर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. अशा परीस्थितीत शेतामध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ताबडतोब या पिकांमधील अतिरिक्त पाण्याचा निचरा करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच खालील नमुद केलेल्या उपाय प्रमाणे सोयाबीन, कापूस, तूर व हळद पिकामधील अतिवृष्टी नंतर पीक व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान शेतकरी बंधुंनी अवलंबावे. 👉 सोयाबीन : सोयाबीन पिकात सततच्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे आणि जमीनीत पाणी साचल्यामुळे पिकांना मुळाद्वारे अन्नद्रव्य घेण्याची क्रिया मंदावली आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्व प्रथम…
तूरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापन
तूरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापनखोडावर काळे डाग पडून खाचा पडतात, हळु हळू झाड वाळायला लागते. हा फ्युजॅरियम मर रोग नाही, तर फायटोप्धोरा रोग आहे. त्यासाठी २५ ग्रॅम मेटालॅक्झील एम ४ टक्के+ मॅन्कोझेब ६४ टक्के (रिडोमील गोल्ड)(संयुक्त बुरशीनाशक) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खोडावर आणि झाडावर फवारणी करून आळवणी पण करावी. किंवा ट्रायकोडर्मा २५ ग्रॅम/ १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी व आळवणी करावी.
खरीप पेरणीपूर्वी नियोजन. सर्व मुख्य खरीप हंगामातील पीक नियोजन 2024
खरीप पेरणीपूर्वी नियोजन. सर्व खरीप हंगामातील पीक करीता लिंक वर क्लिक करा https://youtu.be/C_5tnrwb7Z0
ज्वारी लागवड संपूर्ण माहिती
रब्बी ज्वारी : पेरणी कालावधी, बिज प्रक्रीया खते वापर ई बाबतीत माहीती.रब्बी ज्वारी ची पेरणी करीता 10 किलो बियाणे प्रती हेक्टरी वापरावे.बिज प्रक्रीया :काणी रोगाचा प्रादुर्भाव न होण्यासाठी बियाण्यास 5 ग्रॅम गंधक प्रति किलो बियानासा लावावे. तसेच खोडमाशीचा प्रादुर्भाव न होण्यासाठी 3 ग्रॅम थायोमीथाक्झाम 70 डब्ल्यु अथवा इमिडाक्लोप्रीड प्रती किलो बियानास चोळावे.पेरणीचे अंतर:दोन ओळीतील अंतर 45 से.मी. ठेवावेखते :पेरणीच्या वेळी हेक्टरी 40 किलो नत्र : 40 किलो स्फुरद : 40 किलो पालाश दयावे.पिक संरक्षण:पिकामंध्ये पोंगेमर दिसत असल्यास डायमिथोएट 10 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. शेती सेवा 2.1…
तण नाशकाचा वापर : गहु, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई, उस, सुर्यफुल कांदा, भेंडी, मिरची, वांगी.
तण नाशकाचा वापर : गहु, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई, उस, सुर्यफुल कांदा, भेंडी, मिरची, वांगी. गहु - पेरणी नंतर परंतु उगवणीपूर्वी ऑक्सीफलोफेन 23.5 इसी 425 मिली (व्यापारी प्रमाण)प्रती हेक्टरी 750 ते1000 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी त्यानंतर सहा आठवडयांनी निंदणी करावी.हरभरा- पेरणी नंतर परंतु उगवणीपूर्वी पेन्डीमिथालीन 2.5 कि/हे फवारणी करावी त्यानंतर सहा आठवडयांनी निंदणी करावी.ज्वारी- पेरणी नंतर परंतु उगवणीपूर्वी ॲट्राझीन 1.5 कि/हेफवारणी करावी त्यानंतर तीन ते सहा आठवडयांनी निंदणी करावी.करडई- पेरणी नंतर परंतु उगवणीपूर्वी पेन्डीमिथालीन 2.5 कि/हे फवारणी करावी किंवा ऑक्सीप्लोरफेन 425 मिली (व्यापारी प्रमाण) प्रती हेक्टरी त्यानंतर सहा आठवडयांनी…
वेळीच करा कापूस पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापन…..!
डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईतकृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणीआणिडॉ. ए.डी.पांडागळेकापूस संशोधन केंद्र, नांदेडवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी बऱ्याच ठिकाणी पावसाच्या दिर्घ उघडीप नंतर झालेल्या मोठ्या पावसामुळे कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात.कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते अशावेळी सिंचन दिल्यास अथवा मोठे पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. सिंचन दिल्यानंतर किंवा मोठे पाऊस पडल्यानंतर ३६-४८ तासांत आकस्मिक मर ची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान…