वेळीच करा कापूस पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापन…..!
डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईतकृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणीआणिडॉ. ए.डी.पांडागळेकापूस संशोधन केंद्र, नांदेडवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी बऱ्याच ठिकाणी पावसाच्या दिर्घ उघडीप नंतर झालेल्या मोठ्या पावसामुळे कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात.कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते अशावेळी सिंचन दिल्यास अथवा मोठे पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. सिंचन दिल्यानंतर किंवा मोठे पाऊस पडल्यानंतर ३६-४८ तासांत आकस्मिक मर ची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान…